पुणे : आडसाली उसाच्या उत्पादन वाढीसाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक

पुणे : ऊस लागवड करताना माती परीक्षण, खत व्यवस्थापन, उच्च दर्जाचे बियाणे तसेच दोन सरींमध्ये साडेचार फुटाचे अंतर असावे. फवारणी करताना वातावरण महत्त्वाचे असते. यासोबतच आडसाली उसाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पीक न घेता योग्य व्यवस्थापन, उपयोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऊस डॉ. संदीप घोले यांनी केले. पारगाव येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांनी कंपोस्ट खताचा अधिकाधिक वापर करावा. माती परीक्षण, खत, बियाणे यावर लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना एकरी सरासरी चांगले उत्पन्न घेता येऊ शकते असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संदीप सांगळे यांचे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यान झाले. संतोष बोत्रे, अजित शेळके, अमित ताकवणे, ईश्वर ताकवणे, सुनील ताकवणे, विकास कुदळे, संतोष कुल, शरद शिंदे, नाना वडघुले, मनोहर गरदरे, भरत लोले, मच्छिंद्र लोले, राजाराम शितोळे, चंद्रहार देवकर, भानुदास गायकवाड, किरण गवारे, शिवाजी काटे, पांडुरंग लोणकर, विनोद मोरे व कौस्तुभ भागवत यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अँग्रोवनचे वितरण प्रतिनिधी महेश चौखंडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला पारगाव सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र ताकवणे, उपाध्यक्ष चैत्राली काळे, भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, सर्जेराव जेधे, श्यामराव ताकवणे, दशरथ गरदडे, लक्ष्मण ताकवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here