पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे आणि चांगल्या बाजारभावामुळे ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळाला ऊस देणे पसंत करत आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, दौंड तालुक्यातील कारखान्यांनी उसाला हप्त्यापोटी पहिली उचल ३१०० रुपये जाहीर केल्यामुळे गुऱ्हाळचालक चिंतेत पडले होते; कारण कमी किमतीत गुऱ्हाळासाठी कोणी शेतकरी ऊस देईना. शिरूर तालुक्यातील बहुतांश ऊस श्रीगोंदा, दौंड, श्रीनाथ म्हसोबा, भीमा पाटस, अनुराज शुगर, व्यंकटेश कृपा, पराग भीमाशंकर, बारामती इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्यांना जात आहे.
कारखाने जोमात सुरू असल्याने गुऱ्हाळे बंद पडण्याच्या मार्गावर होती. जिल्ह्यात दौंड खालोखाल शिरूर तालुक्यात गुऱ्हाळांची संख्या जास्त आहे. शिरूर, दौंड तालुक्यांत जवळपास ५०० ते ५५० गुऱ्हाळे आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना व खासगी दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, दि माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती अॅग्रो या कारखान्यांना शेतकरी ऊस देत आहेत.
इंदापूर तालुक्यातील निरा भीमा सहकारी साखर कारखाना, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, कर्मयोगी शंकरराव पाटील, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, भीमाशंकर; पराग, जुन्नर तालुक्यातील विघ्नहर, शिरूर तालुक्यातील वेंकटेश शुगर या कारखान्यांना शेतकरी ऊस देत आहेत. कारखानदारांनी २०२५-२६ हंगामासाठी पहिली उचल हप्ता पोटी ३१०० रुपये जाहीर केल्यामुळे गुऱ्हाळचालकांनी ३५०० रुपये बाजारभाव केला आहे. या कारखानदार आणि गुऱ्हाळचालक यांच्यातील स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना यावर्षी उच्चांकी दर मिळाला आहे.

















