एफआरपी प्लस 200 रुपये न दिल्यास तिव्र आंदोलन : राजू शेट्टी

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी नेहमीच पुढे राहणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केला नाही. एफआरपी अधिक 200 रुपये न दिल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, अशा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच ना. बाळसाहेब पाटील यांच्याकडे सहकार आणि पणन विभागाची जबाबदारी असल्याने त्यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देवून शेतकर्‍यांना अधिक दर कसा मिळेल, यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

सातार्‍यात झालेल्या मेळाव्यात कर्जमाफी घोषणेवरुन शेट्टी बोलत होते. यावेळी सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी प्लस 200 रुपये दर निर्णय आठ दिवसात जाहीर न केल्यास संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. तसेच एफआरपीची रक्कम न देणार्‍या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या मेळाव्यात स्वाभिमानी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सातारचे राजू शेळके, फलटणचे धनंजय महामुलकर यांची निवड करण्यात आली. स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी खटावचे श्रीकांत लावंड, कराडचे देवानंद पाटील, तर युवक जिल्हाध्यक्ष म्हणून भोसरे येथील तानाजी देशमुख यांची निवड करण्यात आली.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here