सांगली : ऊसतोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने श्री श्री सद्गुरू कारखान्याची ४७ लाखांची फसवणूक

आटपाडी : राजेवाडी येथील श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याची नऊ जणांनी ४७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रवीण शिवाजी फुले (राजेवाडी) यांनी नऊ जणांच्या विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. २२ ऑगस्ट ते ५ नोव्हेंबर २०२४ यांदरम्यान हा व्यवहार घडला होता. संशयितांनी प्रत्यक्षात पैसे घेऊन मजूर आणि वाहने पुरवली नाहीत. त्यामुळे कारखाना प्रशासनाने त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र, तेही दिले जात नसल्याने नऊ जणांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी राजाभाऊ दत्तात्रय मुंढे (पहाडी पारगाव, ता. धारूर जि. बीड), नितीन अश्रुबा नागरगोजे (देवगड ता. केज), महादेव चंद्रसेन मुंडे, ज्ञानोबा अंकुश घायतिडक, रमेश पांडुरंग मुंडे, (दोघे कोठारबन), श्रीराम एकनाथ मुंडे, जालिंदर एकनाथ मुंडे व बाळासाहेब राजेसाहेब मुंडे (चारदरी, ता. धारूर जि. बीड) यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी साखर कारखान्याला ऊस तोडणीसाठी मजूर टोळी, वाहतुकीसाठी वाहने, घंटागाडी आदी उपलब्ध करून देण्याकरिता नोटरी करार करून ४७ लाख रुपये उचलले होते. मात्र, मजूर पुरवलेच नाहीत आणि पैसेही परत दिलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here