सातारा : सरकारच्या आदेशाने भरारी पथकांकडून जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी केली जात आहे. यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील वजनकाट्यांची शासकीय प्रतिनिधींसह शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींच्या समितीने तपासणी केली. कारखाना कार्यस्थळाला समितीने अचानक पाहणी केली. यावेळी वजन करून गव्हाणीकडे गेलेल्या ऊस वाहनांना परत वजन काट्यावर बोलवून त्यांची वजने घेण्यात आली. या चाचणीत वजन अचूक नोंदवण्यात येत असल्याचे समितीला दिसून आले. तसा निष्कर्ष समितीने काढला.
समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी अचूक वजन नोंदवण्यात आले. त्यामुळे कारखान्याचे वजन काटे अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या समितीने दिले आहे. माजी सहकार व पणनमंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री कारखान्याचे कामकाज सुरू आहे. भरारी पथकाच्या तपासणीत कारखान्याचे वजन काटे असल्याचे पुन्हा अधोरेखित अचूक झाले. यावेळी वैधमापन निरीक्षक ए. एस. अग्रवाल, लेखापरीक्षक डी. ए. जाधव, उप लेखापरीक्षक एस. सरकारी एस. जंगम, पुरवठा विभागाचे अनिरुद्ध होवाळ, आकाश कांबळे, रयत क्रांती संघटनेचे अशोक लोहार, विशाल फुटाणे, तात्यासो पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, दीपक पाटील उपस्थित होते.

















