सोलापुरातील साखर कारखान्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 15 कोटी जमा होणार

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुमारे 15 कोटी जमा होणार आहेत. एकावेळी 15 कोटींचा सर्वाधिक निधी जिल्हातील साखर उद्योगाच्या माध्यमातून सरकारला मिळणार आहे.राज्यातील विविध संस्था, संघटना, कारखाने सरकारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी मदतीसाठी एक पाऊल पुढे यावे, तसेच कारखान्यांनी आपल्या नफ्यातून प्रती टन 15 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचे आवाहन केले आहे. लवकरच तसा शासन अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. शासन निर्णय झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुमारे 15 कोटी जमा होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here