रहरा, उत्तर प्रदेश: भाकियू पदाधिकार्यांच्या बैठक़ीमध्ये 25 ऑक्टोबर पासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु करण्याची मागणी करण्यात आली. बैठक़ीत सांगितले की, हंगाम उशिरा सुरु झाल्यास शेतकर्याचे नुकसान होईल. चालू महिन्यामध्ये कारखाना सुरु झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
रविवारी दुपारी ब्लॉक परिसरामध्ये आयोजित बैठक़ीमध्ये तहसील अध्यक्ष ठाकुर महेश सिंह यांनी सांगितले की, रहरा विजघरावर अधिक भार असल्याने विज पुरवठा पुरेसा होत नाही. तलावडा फीडर बनवण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय ऊस थकबाकीची मागणी करण्यात आली. सांगितले की, नवा हंगाम सुरु होणार आहे आणि आतापर्यंत गेल्या हंगामातील ऊसाचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत. रामपाल सिंह यांनी सांगितले की, 23 ऑक्टोबर ला विज विभागाचे कार्यकारीअभियंत्यांना घेराव घातला जाईल. 16 ऑक्टोबरला मंडलायुक्त मुरादाबाद यांना घेराव घातला जाईल. चंदनपुर साखर कारखान्याकडून ऊस प्रजाति 0238 च्या लागवडीस नकार न देणे,खरेदी केंद्रांवर प्रत्येक जातीच्या तांदळाची खरेदी करणे, प्रथमा यूपी ग्रामीण बँकेमध्ये सुरु असलेली अनियमिततां रोखणे, वंचित शेतकर्यांना लवकरात लवकर शेतकरी सन्मान निधी चा लाभ देण्याची मागणी केली आहे. दरम्यान हसनपुर ब्लॉक अध्यक्ष काले सिंह, गंगेश्वरी ब्लॉक अध्यक्ष टीटू त्यागी, शीशपाल सिंह, चौधरी महिपाल सिंह, महेश पहलवान, चौधऱी फूल सिंह, गुल्ली सिंह, हरदयाल सिंह आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.











