देशात १३ जूनपर्यंत ५५.०७ लाख हेक्टरवर उसाची लागवड : कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग

नवी दिल्ली : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने १३ जून २०२५ पर्यंत खरीप पिकांखालील क्षेत्राची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये देशातील महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या ऊसाचे क्षेत्र १३ जूनपर्यंत ५५.०७ लाख हेक्टर नोंदवले गेले आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे ०.२० लाख हेक्टरने किरकोळ वाढ झाली होती. मागील वर्षी ५४.८८ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती, असे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार दिसून येते.

साखर उद्योगाने आगामी २०२५-२६ च्या साखर हंगामासाठी आधीच आशावादी अंदाज व्यक्त केला आहे. ISMA च्या मते, अनुकूल हवामान परिस्थिती आणि गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात वाढलेल्या ऊस लागवडीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये ऊस लागवड सुधारली आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२५ मध्ये गाळप हंगाम वेळेवर सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने २०२५ मध्ये ‘सामान्यपेक्षा जास्त’ नैऋत्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे, जो ऊस लागवडीसाठी महत्त्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here