अहिल्यानगर : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. जनसेवा मंडळाचे सर्व २१ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विरोधी शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या विरोधात शिवसेनेच्या राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ आणि राष्ट्रवादीचे अमृत धुमाळ, अजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बचाव कृती समितीचे पॅनल उभे ठाकले होते. एकूण २१२८३ पैकी १२६६२ मतदान झाले होते.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले कि, जनसेवा मंडळावर सभासदांनी विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ ठरवू, बंद पडलेता कारखाना चालविणे अवघड आहे. हे मोठे आव्हान आहे. परंतु हे शिवधनुष्य उवतण्याची जबाबदारी जनसेवा मंडळाचे नेते अरुण उनपुरे यांनी स्वीकारली आहे. हंगाम सुरू करण्याला प्राधान्यक्रम राहील. कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ म्हणाले कि, मतदारांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारण आहे. उच्च न्यायालयात संघर्ष करून कारखाना जिवंत ठेवा सभासदांच्या मालकीचा राहिला. समासदांना मतदान करता आहे, याचे समाधान आहे. जनसेवा मंडळाचे प्रमुख अरुण तनपुरे यांना कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आहेत.
जनसेवा मंडळचे प्रमुख नेते अरुण तनपुरे म्हणाले की, खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. जनसेवा मंडळाचे सर्व २१ उमेदवार विजयी झाले, मतदान करणाऱ्या सभासदांचा उत्साह वाखाण्यासारखा होता. सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. कार्यकायचि आभार, तसेच काही मान्यवरांनी क्याच प्रकारे मदत केली, त्यांचेही आभार मानतो. हे ऋण राहुरी तालुका विसरणार नाही. शेतकरी विकास मंडळचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे म्हणाले की, मतदारांनी विरोधात दिलेला कौल स्वीकारण आहे. कनसेवा मंडळाला विजयाच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी येत्या वर्षभरात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा. त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या समस्या सोडवाव्यात. शेतकरी, कामगारांना न्याय द्यावा.