सीतामढी, बिहार : साखर कारखान्यामध्ये यावर्षी ऊसाचा गाळप हंगाम विधिवत सुरु केला जाणार आहे. तर शेतकर्यांच्या शेतामध्ये लावलेल्या ऊसाची पूर्ण खरेदीही केली जाणार आहे. याचा निर्णय बुधवारी ऊस उत्पादक संघ तसेच रीगा कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश धानुका यांच्या दरम्यान झालेल्या चर्चे मध्ये घेण्यात आला. वर्च्युअल कॉन्फरसिंग च्या माध्यमातून झालेल्या या चर्चेमध्ये केंसीसी ची संपूर्ण देणी कारखाना व्यवस्थापनाला करणे आणि तो निधी व्यवस्थापनाद्वारा भागवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापकीय संचालक धानुका यांनी थकबाकीची स्थिती स्पष्ट करताना सांगितले की, ऊसाचे 69 करोड रुपये देणे बाकी आहे. जे लवकरात लवकर भागवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी सरकारने कारखान्याला देय भागवण्यासाठी निधी द्यावा तसेच कर्ज देवून कारखान्याला सहकार्य करण्याची आग्रही मागणी केली आहे. यावेळी लखन देव ठाकुर, गुणानंद चौधऱी आदी उपस्थित होते.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.













