भारत-पाकिस्तानमधील निवळलेला तणाव, अमेरिका-चीनमधील थंडावलेल्या व्यापार युद्धामुळे शेअर बाजार गगनाला भिडला

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष कमी झाल्याच्या बातमीने सोमवारी भारतीय शेअर बाजार निर्देशांक कमालीचे वधारले.अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धे कमी झाल्यामुळे बाजार आणखीच चढला. अमेरिका आणि चीन यांनी करार केला आहे की दोन्ही देश ९० दिवसांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी पूर्वी घोषित केलेले परस्पर कर आणि प्रति-कर मागे घेतील आणि दरम्यान, चीन अमेरिकन वस्तूंवर १० टक्के कर लादेल आणि अमेरिका चिनी वस्तूंवर सुमारे ३० टक्के कर लावेल. आज सेन्सेक्स २,९७५.४३ अंकांनी वाढून ८२,४२९.९० अंकांवर बंद झाला, तर निफ्टी निर्देशांक ९१६.७० अंकांनी वाढून २४,९२४.७० अंकांवर बंद झाला.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे बाजारातील तेजीचा मार्ग मोकळा झाला आहे.आर्थिक वर्ष २६ मध्ये उच्च जीडीपी वाढ आणि उत्पन्न वाढीचे पुनरुज्जीवन, महागाई आणि व्याजदरात घट यासारख्या देशांतर्गत सकारात्मक संकेतामुळे बाजारात तेजी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असेही विजयकुमार म्हणाले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणारी खरेदी यामुळेही बाजारात उसळी पाहायला मिळाली. निफ्टी फार्मा निर्देशांक ०.१५ टक्क्यांनी वधारला तर इतर निर्देशांक २-४ टक्क्यांनी वधारले.भारतीय शेअर बाजारात आगामी काळात महागाईचे आकडे, चौथ्या तिमाहीतील उत्पन्न याचा परिणाम पाहायला मिळेल. (एएनआय)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here