लखनौ : बलरामपुर चीनी मिल्स लिमिटेडने मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारसोबत लखीमपूर खेरी येथील कुंभी साखर कारखान्यात २५० टीपीडी पॉलीलेक्टिक ॲसिड (PLA) प्लांट उभारण्यासाठी सामंजस्य करार (MOU) केला. या सामंजस्य करारात २,८५० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक समाविष्ट आहे. त्यामुळे राज्यात २२५ नवीन रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग यांच्या उपस्थितीत इन्व्हेस्ट यूपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विजय किरण आनंद आणि बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक अवंतिका सरावगी यांच्यात हा सामंजस्य करार झाला.
हा प्रकल्प मे २०२५ मध्ये कार्यान्वित होणार आहे आणि औद्योगिक नवोपक्रम आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वचनबद्धतेला बळकटी देईल असे सांगून मुख्य सचिव मनोज कुमार सिंग म्हणाले, उत्तर प्रदेश शाश्वत औद्योगिक विकासात आघाडीचे राज्य आहे. बलरामपूर चिनी मिल्सची ही ऐतिहासिक गुंतवणूक प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाप्रती आमची वचनबद्धता बळकट करते.
बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक सरावगी यांनी राज्य सरकारसोबतच्या सहयोगी प्रयत्नांवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, बायोप्लास्टिकमध्ये नावीन्यपूर्णतेला चालना देणे आणि प्रदूषणमुक्त भविष्य घडवण्यासाठी योगदान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. इन्व्हेस्ट यूपीचे सीईओ विजय किरण आनंद यांनी हा प्रकल्प मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशला पसंतीचे गुंतवणूक ठिकाण म्हणून स्थापित करण्याच्या आणि शाश्वत औद्योगिक विकासाद्वारे १००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे.