उत्तर प्रदेश : बिलारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलांप्रश्नी भाकियू करणार आंदोलन

मुरादाबाद : बिलारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे ५ डिसेंबरपर्यंत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप पैसे मिळालेले नाहीत. याप्रश्नी शुक्रवारी उप जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय किसान युनियनच्या बैठकीत घेण्यात आला. बुधवारी शहरातील शाहूकुंज कॉलनीत अराजकीय भाकियु संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष चौधरी महेंद्रसिंग रंधावा उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत सर्व शेतकरी ६ जून रोजी थकीत ऊस बिलांप्रश्नी उपजिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करतील असा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी साखर कारखानदारांच्या आश्वासनानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. जर कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रलंबित रक्कम दिली नाही आणि आश्वासने पूर्ण केली नाहीत, तर यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी होतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मुरादाबाद जिल्हाध्यक्ष सतीश चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष अंकुर चौधरी, तालुकाध्यक्ष विक्की चौधरी, सुरजसिंग, खिलेंद्रसिंग, राजपालसिंग, उदयपाल सिंग, नमित सिंग, आशु चौधरी, नेश चौधरी, ए. चौधरी, उदित चौधरी, इस्तेखार सैफी, मोहित चौधरी, रमाकांत सैनी, रियासत हुसेन, नजाकत सैफी, सतेंद्र लाथर, विशाल काजला, राजकुमार कश्यप, मनोज शिवम आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here