महाराष्ट्रात १०१ साखर कारखाने बंद

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, २९ मार्च २०२१ अखेर १०१ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २९ मार्चपर्यंत १८८ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९५७.६६ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०००.७१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४५ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, सोलापूर विभागात ४१ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातही ३० कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागातील आणि पुणे विभागातील प्रत्येकी नऊ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. अहमदनगर विभागात सात कारखान्यांचे गाळप बंद झाले. तर औरंगाबाद, अमरावती या विभागातील प्रत्येकी २ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here