महाराष्ट्रात १११ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, ७ एप्रिल २०२१ अखेर १११ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात आला आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ७ एप्रिल २०२१ अखेर १८९ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९७९.०६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. एकूण १०२४.८३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील सर्व ४३ कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३१ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. नांदेड विभागात १३ कारखाने बंद करण्यात आले आहेत. पुणे विभागात १२ कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. अहमदनगरमध्ये सात कारखाने बंद झाले असून औरंगाबाद, अमरावती या दोन्ही विभागात प्रत्येकी दोन कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभागात १ एक साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपुष्टात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here