उत्तर प्रदेशातील १२० पैकी १०० साखर कारखाने दर आठवड्याला ऊस बिले देतायत : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेशातील साखर कारखानदार आता शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे बील देत आहेत. राज्यातील १२० पैकी १०० साखर कारखान्यांनी एका आठवड्यात बिले दिली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कृषिका-शेतीपासून समृद्धीपर्यंत’ या कार्यक्रमात बोलताना राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांवर भर दिला. ते म्हणाले की, ऊस क्षेत्रात आता १२० साखर कारखाने सुरू आहेत. त्यापैकी १०० कारखान्यांनी आठवड्याभरात शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की उत्तर प्रदेश ऊस, साखर आणि इथेनॉल उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. भारताच्या बटाटा उत्पादनात २५ टक्के आणि मका उत्पादनात ३० टक्के योगदान देत आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी भात, गहू, कडधान्य आणि तेलबियांच्या लागवडीत विक्रम प्रस्थापित केले आहेत. शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाने आणि ‘डबल इंजिन’ सरकारच्या पुढाकाराने मिळालेल्या या यशामुळे देशाची अन्नधान्याचे कोठार म्हणून उत्तर प्रदेशला सन्मान पुन्हा मिळाला आहे.

कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भर देताना ते म्हणाले की उत्तर प्रदेशकडे देशाच्या केवळ ११ टक्के भूभाग आहे. परंतु देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात सुमारे २० टक्के वाटा आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतकरी उत्पादन तिप्पट करू शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करत असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, खऱ्याखुऱ्या प्रगतीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना कधीही इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी मृदा आरोग्य कार्ड आणि पंतप्रधान पीक विमा योजना आणि पीएम कृषी सिंचन योजना यासारख्या महत्त्वाच्या योजनांवर प्रकाश टाकला.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here