महाराष्ट्रातील गळीत हंगामाला आता गती आली आहे. साखर आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात एकूण १४१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ६८ सहकारी आणि ७३ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११२.५२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्याने आतापर्यंत ९७.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सर्वसाधारण साखर उतारा ८.६४ टक्के इतका आहे.
कोल्हापूर विभागात आतापर्यंत २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. कोल्हापूर विभागात ३०.७९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागात २६ कारखाने सुरू आहेत. पुणे विभागाने आतापर्यंत २५.४० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.