दक्षिण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सरकारकडून १४६.५ कोटींची नुकसान भरपाई

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठीची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. राज्य सरकारने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानभरपाईचा निधी दिला आहे. कोल्हापूरसाठी ८५.७० कोटी रुपये, सांगलीसाठी ५२.७५ कोटी रुपये आणि सातारा विभागासाठी ८.०१ कोटी रुपये जारी करण्यात आली आहेत.

जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे या तीन जिल्ह्यात १.५ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत सरकारच्या आदेशात म्हटले आहे की, राज्याच्या एसडीआरएफच्या निकषानुसार ही नुकसानभरपाई करण्यात आली आहे. या जिल्ह्यात पुराने ऊस, भाजीपाला आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, २०१९ च्या पुरानंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तसेच धोरणामुळे शेतकरी नेते आणि शेतकरी सरकारवर नाराज आहेत. तत्कालीन भाजप सरकारने विना कर्जदार शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या नियमांच्या तीन पट नुकसानभरपाई दिली होती. यासोबतच शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्यात आले होते. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात २०१९च्या धोरणानुसार नुकसानभरपाई आणि पिक कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here