महाराष्ट्रात १५६ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात

पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत २२ एप्रिल २०२१ अखेर १५६ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २२ एप्रिल २०२१ अखेर १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात १००२.८१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून १०५०.९१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालानुसार सोलापूर विभागात ४३ साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत. तर कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आह. नांदेड विभागात २३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर पुणे विभागात २५ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अहमदनगर विभागातील १४ कारखाने बंद झाले असून औरंगाबादमध्ये १० तर अमरावती विभागातील २ कारखाने बंद करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील २ कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here