उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार नव्या १६ डिस्टिलरी

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉलच्या उत्पादन क्षमतेत वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ या दरम्यान नव्याने १ डिस्टिरली स्थापन होत आहेत. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार या साठी १२५०.४४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. याशिवाय ११ साखर कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमता वाढीसाठी मोठी गुंतवणूक केली आहे. या दोन्ही उपायांचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांना कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळविण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही.

२०१७-१८ पासून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत राज्यात ५४ डिस्टिवरींच्या माध्यमातून एकूण २६१.७२ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. हा एक उच्चांक आहे. दालमिया समुहाच्या एका डिस्टिलरीने उत्पादनही सुरू केले असून उर्वरीत १५ डिस्टिलरी या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होतील. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला उत्तर प्रदेश सरकार आणि गुंतवणुकदारांचा फायदा होईल.

पहिल्यांदाच गुंतवणूकदारांनी इतक्या मोठ्या संख्येने डिस्टिलरी सुरू करण्याच आपले स्वारस्य दर्शविले आहे. यामध्ये प्रमुख औद्योगिक घराणे डीसीएम श्रीराम आणि बलरामपूर साखर कारखाना लिमिटेडचा समावेश आहे. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांनी डिस्टीलरीत आपली रुची दर्शवली नव्हती. त्या काळात साखर कारखाने एका पाठोपाठ एक बंद पडले. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सत्तेनंतर हे चित्र बदलले असून सरकारने ऊस शेती आणि साखर कारखानदारीला प्रोत्साहन दिले आहे. व्हिनस, गगलहेरी आणि बुलंदशहर साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here