उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉल उद्योगात १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त

लखनौ : उत्तर प्रदेशचे अतिरित्त मुख्य सचिव (ऊस आणि अबकारी) संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यातील इथेनॉल क्षेत्रामध्ये १६,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. बिझनेस स्टँडर्डने याबाबतचे वृत्त दिले आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील इथेनॉल उपलब्धता आणि मजबूत साखळी पुरवठ्याची श्रृंखला या कारणामुळे इथेनॉल-मिश्रित ईंधनाच्या उत्पादनात भारतात चार्टमध्ये सर्वाधिक उच्च स्थानावर आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोघेही मिळून देशातील ऊस आणि साखर उत्पादनाचा जवळपास ६० टक्के भाग आहेत. सध्या प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, कंपन्या डिस्टिलरी, ब्रुअरीज, मायेक्रोब्रेव्हरी, माल्ट आणि यीस्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आदींची उभारणी करणार आहेत.

सरकारने राज्यात इथेनॉल आणि अल्कोहोलशी संबंधीत उत्पादन युनिट्सच्या स्थापना करण्यासाठी १७ सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये खासगी डिस्टिलरींनी इथेनॉल क्षमता वाढविण्यासाठी ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भुसरेड्डी म्हणाले की, राज्यात आता १,४०० कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीसाठी एलओआय जारी करण्यात आले आहेत.

१० फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये आयोजित दोन दिवसीय युपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटीसाठी (जीआयएस) राज्यातील खासगी गुंतवणुकीच्या प्रस्तावांची संख्या वाढणार आहे. राज्याने १.७ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याची योजना तयार केली आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केले जावू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here