साखर कारखान्याकडून १७.५० कोटी ऊस बिल अदा

मवाना : मवाना साखर कारखान्याने शनिवारी २०२०-२१ या गळीत हंगामातील ऊस बिलांच्या पैशांचे अ‍ॅडव्हान्स ऊस समित्यांना पाठविण्यात आले आहे. यासोबत कारखान्याने १७.५० कोटी रुपये ऊस समित्यांना दिले आहेत. १७ एप्रिलअखेर कारखान्याने १८१.११ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. गेल्यावर्षीपेक्षा १३.६१ लाख क्विंटल ऊसाचे जादा गाळप झाले आहे.

याबाबत माहिती देताना कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (ऊस तथा प्रशासन) प्रमोद बालियान यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, एसएमएस मिळाल्यानंतरच ऊसाची तोडणी करावी. साखर कारखान्याला साफ आणि ताजा ऊस पाठवावा. ऊस खरेदी केंद्रांवर अॅडव्हान्समध्ये ऊस विक्री करू नये. जर एखाद्या शेतकऱ्याने आधीच ऊस दिला तर त्याची जबाबदारी साखर कारखाना अथवा ऊस विभागाकडून घेतली जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here