२३ साखर कारखान्यांनी केले ऊस गाळप बंद

नवी दिल्ली: ऊसाच्या कमीमुळे यंदाच्या हंगामाने साखर कारखान्यांना अडचणीत आणले, ज्याचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्र आणि कर्नाटकात झाला आहे. यामुळे कारखान्यांनी फारच लवकर गाळप बंद केले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) नुसार, 2019-20 हंगामासाठी ज्या 449 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते, त्यातील 23 कारखान्यांनी ऊस मिळाला नाही म्हणून गाळप बंद केले. गेल्या वर्षी, याच अवधीत 521 कारखान्यांनी गाळप सुरु केले होते, ज्यातील 19 कारखान्यांनी गेल्या वर्षी याच तारखेला गाळप बंद केले होते.

महाराष्ट्रातील पश्चिम भागात पूर आणि मराठवाड्यात दुष्काळामुळे ऊस पीकावर परिणाम झाला होता. शिवाय मोठ्या प्रमाणात ऊसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी करण्यात आला. या साऱ्याचा परिणाम गाळपावर झाला आहे. त्याचबरोबर ऊस तोड मजूरांच्या समस्येनेही साखर कारखान्यांना अडचणीत टाकले आहे.
याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. महाराष्ट्र मध्ये 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत साखरेचे उत्पादन 43.38 लाख टन होते, गेल्या वर्षी याच अवधि मध्ये 82.98 लाख टन उत्पादन झाले होते. या सीजन मध्ये संचालित 143 कारखान्यांमध्ये आठ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. गेल्या हंगामात 193 कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतला होता.

कर्नाटकात 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत, 63 कारखान्यांनी परिचालन सुरु केले होते आणि  त्यांनी गेल्या वर्षीप्रमाणे 66 कारखान्यांद्वारा उत्पादित 38.74 लाख टनाच्या तुलनेमध्ये आता 30.80 लाख टन साखर उत्पादन केले आहे. या सीजन मध्ये गाळप करणाऱ्या 63 कारखान्यांमध्ये 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत 13 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here