साखर कारखान्यात २७ लाख क्विंटल गाळप कमी

सेवरही : सेवरही साखर कारखान्यात यंदाच्या गळीत हंगामात ४३ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले. तर गेल्यावर्षीच्या हंगामात ७० लाख क्विंटल उसाचे गाळप झाले होते. यंदा सरासरी २७ लाख क्विंटल गाळप कमी झाले आहे. अति पाणी साचून ऊस वाळल्याने असे घडल्याचे सांगितले जाते.

सेवरही साखर कारखान्यात गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ७० लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. त्यामुळे यंदा उसाची लागवड वाढली होती. मात्र, पावसाळ्यात अति पाणी साचल्याने उसाची वाढ खुंटली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या किमतीला ऊस क्रशरला विकला. परिणामी २०२०-२१ या चालू हंगामात फक्त ४३ टन उसच गाळपास उपलब्ध झाला. केन युनियनचे अध्यक्ष धीरेंद्र कुमार राय ऊर्फ राजू यांनी सांगितले की, कारखान्याला २७ लाख क्विंटल ऊस कमी मिळाल्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. केन युनियनलाही तोट्याला सामोरे जावे लागणार आहे. जर ड्रेनेजची सफाई वेळेवर करून पाणी निचरा करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे चेअरमन राजू यांनी सांगितले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.

सेवरही साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक शरद सिंह म्हणाले, ऊसाचा खालचा आणि वरचा भाग अनेक दिवस पाण्यात राहिला. परिणामी उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकरी शैलेश तिवारी, रामनरेश कुशवाहा, महंत कुशवाहा, सुग्रीव मिश्र, महेश गोंड, पिंकू मिश्र, बबलू राय आदी शेतकऱ्यांनी सांगितले की पाणी निचरा करण्याची व्यवस्था झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. तमकुहीराजचे उपजिल्हाधिकारी ए. आर. फारुखी यांनी ड्रेनेज व्यवस्थेबाबत सिंचन विभागाला माहिती दिल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here