भारती शुगर्सकडून तीन हजाराने ऊस बिल जमा : अध्यक्ष ऋषीकेश लाड

सांगली : नागेवाडी येथील भारती शुगर्स अँड फ्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड (यशवंत शुगर) कारखान्याने दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गाळप झालेल्या उसाला विनाकपात प्रतिटन ३००० रुपयेप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अध्यक्ष ऋषीकेश लाड यांनी दिली. ते म्हणाले, कारखान्याचा यंदा पहिलाच गाळप हंगाम आहे. कारखाना ऊस उत्पादकांच्या पाठीशी उभा राहील. तसेच गाळपासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here