महाराष्ट्रात 41 कारखान्यांनी केले गाळप बंद, 54.73 लाख टन आतापर्यंतचे साखर उत्पादन

पुणे : महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक विभागातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद करणे सुरु केले आहे. आतापर्यंत 41 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. अनेक साखर कारखाने ऊसाच्या कमी उपलब्धतेमुळे अडचणीत आहेत. या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतलेला नाही.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, 10 मार्च, 2020 पर्यंत 41 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. यामध्ये 12 औरंगाबाद, 8 अहमदनगर, 5 सोलापूर, 5 पुणे, 5 कोल्हापूर, 4 नांदेड आणि 2 अमरावती चे साखर कारखाने सामिल आहेत. सध्या आतापर्यंत साखर कारखान्यांनी 492.01 लाख टन ऊस गाळप करुन 11.12 साखर रिकवरी प्रमाणे 547.34 लाख क्विंटल, म्हणजेच 54.73 लाख टन साखर उत्पादन केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here