महाराष्ट्रात ४१ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात

पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत ११ मार्च २०२१ अखेर एकूण ४१ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्लायताने दिलेल्या आकडेवारीनुसार, ११ मार्च २०२१ पर्यंत १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ८८६.५२ लाख टन उसाचे गाळप झाले असून एकूण ९१८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, सोलापूर विभागात एकूण २९ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात ७ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. पुणे, औरंगाबाद आणि नांदेड विभागात प्रत्येकी एक कारखाना बंद झाला आहे. तर अमरावती विभागात २ साखर कारखाने ऊस संपल्याने बंद झाले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here