महाराष्ट्रात ६१ साखर कारखान्यांकडून गाळप बंद

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत, २३ मार्च २०२१ अखेर ६१ साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने आपले गाळप बंद केले आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, २३ मार्च २०२१ पर्यंत १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९३९.२८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून एकूण ९७९.५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सोलापूर विभागात सर्वाधिक ३३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात आतापर्यंत ११ कारखाने ऊस संपल्याने बंद करण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here