महाराष्ट्रातील ६८ साखर कारखान्यांचे गाळप बंद

पुणे: महाराष्ट्रातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत, २७ मार्च २०२१ पर्यंत ६८ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २७ मार्च २०२१ पर्यंत १८८ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९५१.९४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९९३.७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४४ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, सोलापूर विभागात ३३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात १७ कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागात ९ कारखाने बंद झाले असून पुणे विभागातील ३ कारखाने बंद झाले आहेत. तर अहमदनगर, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील प्रत्येकी २ कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here