महाराष्ट्रात आतापर्यंत ७५५ लाख क्विंटल साखर उत्पादन

महाराष्ट्रात विविध विभागांतील साखर कारखाने चांगली कामगिरी करत आहेत. राज्यात चालू हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर कारखाने सुरू आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ या हंगामात ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रात एकूण १९७ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी कारखाने कार्यरत आहेत. ७४८.८५ लाख टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ७५५.१६ लाख क्विंटल साखर उत्पादन सुरू आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी साखर उतारा १०.०८ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४६ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. येथे ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १७७.७६ लाख क्विंटल ऊस गाळप झाले असून १६१.५१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

राज्यात सर्वात अधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात एकूण १७७.७२ लाख टन ऊस गाळप करून २०४.२८ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. येथे साखर उतारा ११.४९ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here