धामपूरमध्ये ८० पथके करणार उसाचा सर्व्हे

धामपूर : धामपूर साखर कारखान्याच्यावतीने ८० पथकांकडून १५ जुलैपर्यंत सुमारे ५० हजार हेक्टरमधील ऊभ्या उसाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. कारखान्याने सर्व्हेचे काम १७ मेपासून सुरू केले आहे. आतापर्यंत १२ हजार हेक्टरमधील उसाचा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हे करताना शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

कारखान्याचे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक मनोज कुमार चौहान म्हणाले, कारखान्याकडून उसाचा सर्व्हे गतीने सुरू आहे. एक पथक जवळपास पाच ते सहा गावांचे सर्वेक्षण करीत आहे. तीन पथकांसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जर सर्व्हे नीट झाला नाही, जर एखाद्या शेतकऱ्याच्या बेपर्वाईमुळे जर एखाद्या शेतचा सर्व्हे राहीला तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे काळजी घेतली जात आहे. सध्या शेतकरी इतर कामांमध्ये व्यस्त आहेत. ऊस पिकावर सद्यस्थितीत कोणताही रोग नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here