25 ऑक्टोबरपर्यंत सुरु व्हावा रमाला साखर कारखाना: रविंद्र मुखिया

रमाला, उत्तर प्रदेश: सहकारी साखर कारखान्याचे माजी उपसभापती रविंद्र मुखिया यांच्या नेतृत्वामध्ये शेतकर्‍यांनी कारखाना व्यवस्थापकांची भेट घेतली. शेतकर्‍यांनी मागणी केली की, नवा गाळप हंगाम 25 ऑक्टोबरपर्यंत सुरु करावा. शेतकर्‍यांचे उर्वरीत देय ताबडतोब करावे.

शनिवारी शेतकरी साखर कारखान्यात आले आणि व्यवस्थापक डॉ. आर बी राम यांना भेटले. रविंद्र मुखिया यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. आतापर्यंत उर्वरीत देयावर व्याजही दिलेले नाही. शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. साखर कारखान्याच्या यार्डची दुरुस्ती करावी. साखर कारखान्यात अर्धवट राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत . रमाला कारखान्याच्या खरेदी केंद्रांना चालवले जावे. बोगी आणि ट्रॉलींच्या गेल्या वर्षीच्या वजनालाच स्वीकृत केले जावे. शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या सोबत बिजेंद्र बूढपूर, जितेंद्र पवार, लोकेंद्र, भूपेंद्र तोमर, सुमित चौधरी, हरेंद्र कुमार, धर्मवीर सिंह, ओमपाल सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here