पुन्हा पाऊस, तीन साखर कारखान्यांचे गाळप ठप्प

बागपत : पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने बागपत, मलकपूर आणि रमाला या साखर कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांकडून तिन्ही साखर कारखान्यांत ऊस पोहोचू न शकल्याने रविवारी सकाळी काम थांबविण्याची वेळ आली.

शनिवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दिवसभर शेतामध्ये शेतकरी जाऊ शकले नाहीत. ऊसाची तोडणी करण्याचे काम झाले नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावर वजन करण्यासाठी ऊस कमीच आला. रिमझिम पावसामुळे ऊस खरेदी केंद्रांतही पाणी भरले. त्यामुळे साखर कारखान्याकडे ऊस पोहोचू शकला नाही. त्यामुळे सकाळी मलकपूर साखर कारखाना बंद करावा लागला. साखर कारखान्याचे युनिट हेड विपिन चौधरी यांनी सांगितले की, पावसामुळे रविवारी सकाळी साखर कारखाना बंद करावा लागला आहे.

तर रमाला सहकारी साखर कारखान्यातही शेतकऱ्यांकडून ऊस पोहोचू शकला नाही. त्यामुळे कारखान्यात उसाचा तुटवडा निर्माण झाला. ऊस केंद्रात पाणी भरल्यामुळे तेथील कामकाज विस्कळीत झाले आहे. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. आर. व्ही. राम यांनी सांगितले की, ऊसाच्या तुटवड्याने गाळप बंद झाले आहे. या दोन्ही कारखान्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यातून होत आहे. तर बागपत कारखान्यातही रात्री उशीरा नो केन स्थिती तयार झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here