कोल्हापूर, दि. 7 जुलै 2018: देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न अवाढव्य झाले आहे. वाढलेल्या साखरेच्या उत्पादनामुळे साखरेला अपेक्षित दर मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर देता येत नाही. पुढील 2019-2020 या गाळप हंगामामध्ये उसाचे जंबो उत्पादन होणार आहे. या उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी यावर्षी तोट्यातली का असेना पण साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. देशातून साखर निर्यात करण्यासाठी खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे प्रति क्विंटल साखर दोनशे ते अडीचशे रुपये तोटा सहन करावा लागणार आहे राष्ट्र राज्याचा विचार करता तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही साखर निर्यात करावी लागणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी हा धोका पत्करला नाही, तर पुढच्या वर्षीही साखरेच्या दराचा आणि पर्यायाने ऊस दराचा प्रश्न ही गंभीर होणार आहे. साखरेच्या दरात शंभर-दोनशे रुपयांची वाढ होत आहे, मात्र सध्याची उपलब्ध साखर पाहता वाढलेला दर हा फार काळ टिकून राहील असं वाटत नाही. साखरेचा साठा कमी करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यातीला चालना दिली पाहिजे किंबहुना शासनानेही याला पाठबळ दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचे भाव 2200 ते 2300 रुपये पर्यंत आहे तेच देशांतर्गत बाजारपेठेत 2900 3100 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तोटा सहन करून साखर निर्यात केली जाणार नाही हे जरी खर असलं तरीही भविष्यातील गाळप हंगामाचे वेध लक्षात घेऊन आतापासूनच साखर निर्यात करावी लागणार आहे.
Recent Posts
WISMA supports MoPNG’s clarification on E20 fuel: ethanol is safe, efficient, and sustainable
West Indian Sugar Mills Association (WISMA) supported the recent clarification issued by the Ministry of Petroleum and Natural Gas (MoPNG), which addresses the unfounded...
कैबिनेट ने घरेलू एलपीजी में हुए नुकसान के लिए तेल विपणन कंपनियों को ₹30,000...
नई दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडल ने शुक्रवार (8 अगस्त, 2025) को घरेलू एलपीजी की बिक्री से हुए नुकसान के लिए तीन सार्वजनिक क्षेत्र की...
बीड : ऊसतोड कामगारांसाठी ‘मिशन साथी’ उपक्रम सुरू
बीड : सामाजिक न्याय विभाग आणि बीड जिल्हा परिषदेच्या वतीने ऊसतोड कामगार महिलांसाठी 'मिशन साथी' उपक्रम, 'मिशन साथी' पुस्तिकेचे विमोचन आणि ऊसतोड कामगार मेळावा...
E20 safe for vehicles: Nitin Gadkari dismisses ethanol-blended fuel fears
Union Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari on Friday dismissed concerns that blending 20% ethanol with petrol (E20) impacts the vehicles, calling...
सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याकडून पोळा सणासाठी ७५ रुपयांचा हप्ता अदा
सोलापूर : येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसास कारखान्याने आतापर्यंत प्रतिटन २७,०० रुपयांप्रमाणे रक्कम अदा केली आहे....
बीड : ऊसतोड कामगार कल्याण मंडळ नियोजन विभागाकडे सोपविण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी
बीड : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ नियोजन खात्याशी जोडावे, अशी मागणी माजी मंत्री धनंजय...
गेल्या पाच वर्षात कर्नाटकात ९ तर महाराष्ट्रात ७ नवीन साखर कारखाने स्थापन : केंद्र...
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत भारतातील साखर उद्योगात प्रचंड वाढ झाली आहे, पाच प्रमुख राज्यांमध्ये २२ नवीन साखर कारखाने सुरू झाले आहेत. ग्राहक...