ट्वीटरवरुन ऊस थकबाकी भागवण्याबाबत उठवला आवाज

बिजनौर : राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार वीएम सिंह यांनी सुरु केलेल्या ऊस थकबाकी व्याजासहित भागवण्यासाठीच्या ट्वीट आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकर्‍यांची साथ मिळाली. शेतकर्‍यांनी ट्वीट करुन ऊस थकबाकीची मागणी केली. कोरोना संकटाला पाहता, ट्वीट करुन शेतकर्‍यांनी ऊस थकबाकी भागवण्याची मागणी केली होती.

सरदार वीएम सिंह यांचे निकटवर्तीय आदित्य चौधरी यांनी सांगितले की, आता काही मंडळांनी तसेच काही जिल्ह्यामध्ये आईटी सेल चे गठन केले आहे. पूर्ण भारतवर्षातून शेतकरी पूत्र आपला हक्क ट्वीटरच्या माध्यमातून सरकारकडे मागतील आणि सरकारकडून हक्क घेतीलच. जोपर्यंत शेतकरी पुत्रांना मजूरांना त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय शेतकरी मजूर संघटनेचा संघर्ष सुरुच राहील. हेमेंद्र कुमार कालदेव यांनी सांगितले की, शेतकरी मजूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार वीएम सिंह यांच्या आव्हानावर राष्ट्रीय शेतकरी मजूर संघटना आणि शेतकर्‍यांनी 26 जुलै ला सोशल मिडियावर ट्वीटरवरुन व्याज भागवण्याची मागणी केली. आपली मागणी सोशल मिडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानां पर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केला. जिल्हा बिजनौर च्या युवकांमध्ये याबाबतचा उत्साह पाहिला. 26 जुलै ला दुपारपासूनच युवक वेगवेगळ्या गावांमध्ये मंडळ बनवून बसले आहेत आणि 4 वाजताच ट्वीटर वर व्याजासह ऊस थकबाकी भागवण्याची मागणी केली. पूर्ण भारतामध्ये व्याजासहीत ऊस थकबाकी ट्वीटर वर टॉप 30 मध्ये सातव्या नंबरवर ट्रेंड आहे. आईटी सेलचे जिल्हा अध्यक्ष अचल शर्मा म्हणाले, शेतकर्‍यांनी हे सांगितले आहे की, शेतकरी केवळ ट्रॅक्टरच नाही आता ट्वीटर ही चालवणे शिकले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here