कोल्हापूर विभागात सुमारे १०० लाख क्विंटल साखर उत्पादन

महाराष्ट्रातील कारखाने साखर उत्पादनात चांगली कामगिरी करत आहेत. साखर उत्पादन आणि उतारा या बाबतीत राज्यात कोल्हापूर विभाग पहिल्या क्रमांकावर आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, १९ डिसेंबर २०२१ अखेर कोल्हापूर विभागातील साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. आणि राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात ९२.२२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यापासून ९९.३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.७७ टक्के आहे.

हंगाम २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात एकूण १८६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९४ सहकारी आणि ९२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ३७२.४९ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत ३५२.८ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४७ टक्के होता.

सोलापूर विभागात सर्वाधिक साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. येथे आतापर्यंत ४३ कारखाने सुरू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here