थकबाकी नाही, आता कारवाईसाठी नोटीस

बिजनौर: ऊस थकबाकी देण्यात दुर्लक्ष करणाऱ्या साखर कारखान्यांना आता पैसे देण्यासाठी नोटीस देण्यात येणार नाही. या कारखान्यांना आता कारवाईसाठी नोटीस दिल्या जात आहेत. कारखान्यांनी लवकर थकबाकी दिली नाही तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई होऊ शकेल. जिल्हयातील नऊ मधील चार सााखर कारखान्यांनी अजूनही थकबाकी भागवलेली नाही.

बजाज ग्रुपच्या बिलाई काारखान्यावर जवळपास १०० करोड, बिजनौर कारखान्यावर ४२ करोड, चांदपूर काारखान्यावर ३७ करोड, बहादूरपूर कारखान्यावर १७ करोड रुपयांंचे देय बाकी आहे. चारही कारखान्यांवर २०० करोडचे देय आहे. चारही साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांचे रिपोर्ट दाखल केले आहेत. बिलाई साखर कारखान्याने थकबाकी भागवण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंतची मुदत मागितली आहे. बिजनौर आणि चांदपूर साखर कारखाना शासनााकडू अनुदान मिळाल्यानंतर थकबाकी भागवणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थकबाकी साठी ३१ ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत थकबाकी भागवण्यसाठी साखर कारखान्यांना अनेकदा नोटीस दिली आहे. आता ऊस विभाग थकबाकी साठी साखर कारखान्यांना नोटीस देणार नाहीत, तर थेट कारवाई करण्यााचीच नोटीस दिली जाईल. विभागाने याबाबत शासनालाही अवगत केले आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या नुसार कारखान्यांना अनेकदा थकबाकी भागवण्याबाबत सांगितले आहे. आता कारखान्यांवर कारवाई केली जाईल.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here