साखर कारखान्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्यानंतर शेतकर्‍यांनी केले ट्रॅफिक जाम

जींद, हरियाणा: साखर कारखान्यामध्ये तांत्रिक बिघाड येणे आणि काम बंद होण्यामुळे नाराज शेतकर्‍यांनी जींद पटियाला राष्ट्रीय राजमार्ग बंद केला. जवळपास चार तासापर्यंत मार्गावर ट्रॅफिक जाम राहिला, ज्यामुळे प्रवासी नाराज होते. शेवटी, डीसी आदित्य दहिया आणि इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोचून नाकाबंदी करणार्‍या शेतकर्‍यांना शांत केले.

10 नोव्हेंबर ला हरियाणाचे सहकार मंत्री बनवारी लाल यांनी ज्या कारखान्याचे उद्घाटन केले होते, त्या कारखान्याला कायम तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागते. शेतकर्‍यांनी आपल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज ना मोठ्या संख्येमध्ये रस्त्यावर पार्क केले.

एका शेतकर्‍याने सांगितले की, मी गेल्या तीन दिवसांपासून उस विकण्याची वाट पहात होतो. पण सारे व्यर्थ झाले. उसाचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे आणि शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. कारखान्याला करोडो रुपये मिळत आहेत, पण याचे उद्घटान झाल्यानंतर कारखाना चांगल्या पद्धतीने काम करत नाही. शेतकर्‍यांनी सांगितले की, त्यांनी डिप्टी कमिश्‍नर ना सूचित केले आणि जेव्हा अधिकारी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरले, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय राजमार्गावर रस्ता रोको केला.

जींद चे डीसी आदित्य दहिया यांनी सांगितले की, आम्ही कैथल च्या कारखान्यामध्ये उस पाठवला आहे, जोपर्यंत तांत्रिक समस्या सुटणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here