कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी लवकर ऊस बिले द्यावीत

अमरोहा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. पैसे लवकर मिळाले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

भारतीय किसान युनीयन महाशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सिंह आर्य यांनी कालाखेडा येथील किसान सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस खरेदी करेपर्यंत कारखाना सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. जर ऊस शेतात उभा असताना आधीच कारखाना बंद केल्यास आंदोलन केले जाईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊस बिले अदा करावीत. शेतकऱ्यांना सद्यस्थितीत पैशांची खूप गरज आहे. साखर कारखान्यांनी संकटकाळात शेतकऱ्यांना साथ द्यावी. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here