ऊसाचे वजन न केल्याने संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन

बागपत : रात्री सूचना देऊनही ऊसाचे वजन करण्यासाठी केंद्रावर लिपिक उपस्थित नसल्याने सांकरौद गावातील संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडे लिपिकाची तक्रार केली.
सांकरौद येथील केंद्रावर नेहमीच ऊसाच्या वजनाबाबत शेतकऱ्यांसमोर अडचणी येतात. मंगळवारी सकाळी शेतकरी आपला वाहनांतून ऊस घेऊन तेथे पोहोचले. मात्र, दहा वाजल्यानंतरही लिपिक वजन करण्यासाठी तेथे आला नाही. शेतकऱ्यांनी संपर्क साधल्यावर त्याचा फोन स्वीच ऑफ होता. काही वेळानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केले.

अधिकारी आपली मनमानी करत, सवडीनुसार उसाचे वजन करतात. त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणीशी देणे-घेणे नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी उद्या वजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी परतले. अधिकारी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना दुसऱ्या केंद्वावरुन ऊस वजन करुन देतात असा आरोप आहे. खेकडा ए मार्गावरही अनेक दिवसांनंतर उसाचे वजन करण्यात आले. रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीत अडथळे आले. वजन झाल्यानंतर ऊसाची वाहने निघून गेली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here