ऊस शेती फायदेशीर बनविण्याचे ध्येय ठेवा: डी. के. शर्मा

कसाया : शास्रीय पद्धतीने ऊस शेती केल्यास दुप्पट उत्पादन आणि लाभ मिळवणे शक्य आहे असा सल्ला बिर्ला ग्रुपचे संचालक डी. के. शर्मा यांनी शेतकऱ्यांना दिला. कुशीनगर नगरपरिषदेच्या खेदनीतील शहीद भगत सिंह नगर वॉर्डमधील प्राथमिक विद्यालयात वसंतकालीन ऊस विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना ऊस शेती फायदेशीर कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.
ढाडा येथील न्यू इंडिया शुगर मिलतर्फे आयोजित चर्चासत्रात बिर्ला ग्रुपचे संचालक शर्मा म्हणाले, शेतकऱ्यांनी लागवडीवेळी बियाण्याची निवड काळजीपूर्वक करावी. ऊस शेतीमध्ये आपण आंतरपिके घेऊ शकतो. तो आपल्याला दुहेरी लाभ मिळवून देतो.

ऊस विभागाचे सरव्यवस्थापक मनोज कुमार बिष्णोई यांनी सांगितले की, ऊस शेती करण्यासाठी उसाची नर्सरी एक वर्ष आधीच तयार करा. त्याची योग्य पद्धतीने देखभाल केली पाहिजे. बियाणे म्हणून तयार केलेल्या उसाचा वापर आपण पुढील तीन वर्षे करू शकतो. शेतकऱ्यांनी एक सामूहिक पद्धतीने उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले तर पिकांची सुरक्षितताही वाढेल. खंदक पद्धतीने उसाची लागवड केल्यास अधिक फायदा मिळू शकतो.

कार्यकारी अध्यक्ष करण सिंह म्हणाले, पिकांना योग्य पोषणमूल्ये मिळाल्यास त्यांची वाढ चांगली होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवर्धन प्रसाद गौंड होते. वरिष्ठ ऊस व्यवस्थापक नरेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जनार्दन सिंह यांनी आभार मानले. यावेळी वरिष्ठ ऊस अधिकारी पियूष राव, पारसनाथ पांडे, कलामुद्दीन, रामानंद, अशोक सिंह, शिवपूजन दुबे, अवधेश सिंह, केदारनाथ यादव, विश्वनाथ ठाकूर, छोटेलाल सिंह, मौलवी अन्सारी, हरिश्चंद्र कुशवाहा, रामगीना कुशवाा, रिंकू सिंह, रवींद्र यादव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here