टोळांपासून ऊस पिकाच्या सुरक्षेसाठी सुरु आहेत सर्व आवश्यक उपाय

लखनऊ/भोपाळ : उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील कृषी विभागांसाठी टोळधाडीशी निपटणे नवीन आहे. यासाठी किटकनाशकांच्या फवारणी शिवाय, स्थानिक प्रशासनाने अपारंपरिकतेला जवळ केले आहे. आणि संभावित रुपाने अप्रमाणित- अर्थात सायरन वाजवणे, जोरात संगीत वाजवणे आणि कीड्यांना घाबरवण्यासाठी ड्रोनचा उपयोग करणे आदी.

ऊस आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी सांगितलें की, आमच्या जवळ गेल्या प्रमुख टोळ धाडीच्या आक्रमणाचे कोणतेंही रेकॉर्ड नाही. त्यांनी सांगितले की, ऊसाच्या पिकाच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक सुरक्षात्मक उपाय करण्यात येणार आहेत. भूसरेड्डी उत्तर प्रदेशात टोळांसंदर्भातील बाबींचा समन्वय करीत आहेत.
प्रयागराज चे जिल्हा कृषी अधिकारी अश्‍विनी कुमार सिंह यांनी सांगितले की, आम्ही शेतकर्‍यांना सूचित केले आहे की, ते टीन ड्रम, प्लेटस आदी वाजवून टोळांना दूर घालवू शकतील. याशिवाय, त्यांना टोळांपासून बचाव करण्यासाठी आपल्या पीकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रयागराज ची सर्व गावे आणि शेतकर्‍यांना टोळांच्या आक्रमणाबाबत सतर्क केले जात आहे आणि जर ते झुंड दिसले तर त्याबाबत ग्रामपंचायत आणि कृषी तांत्रिक सहायकांच्या माध्यमातून जिल्हा अधिकार्‍यांना सूचना देण्यास सांगितले आहे. आगरा जिल्हा प्रशासनाने रासायनिक स्प्रे असलेले लैस 204 ट्रॅक्टर तैनात केले आहेत . झेंसी जिल्हा प्रशासनाने फायर ब्रिगेड ला रसायनांच्या सोबत स्टैंडबाय वर राहणे आणि किटकांना पळवण्यासाठी सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशामध्ये झांसी, ललितपूर आणि हमीरपूर जिल्ह्यामध्ये टोळांनी पिकांचे नुकसान केले आहे. आणि आगरा, अलीगड, मथुरा, फिरोजाबाद आणि इटावा सारख्या आणखी 15 जिल्ह्यांना धोका आहे.

भूसरेड्डी यांनी सांगितले की, ऊसाच्या पिकाच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक सुरक्षात्मक उपाय केले जात आहे. त्यांनी सांगितले की, जर ऊसाच्या पिकामध्ये टोळ दिसले, तर विभागाने कीटकनाशक क्लोरपिरीफोस 20 पर्सेट इसी, क्लोरोपिरीफोस 50 पर्सेट इसी, बन्डीओमेथ्रीन, फिप्रॉनील आणि लंब्ड यांची तात्काळ फवारणी करण्याची शिफारस केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here