साखर निर्यातीला परवानगी दिल्यास उद्योग सुरळीत चालण्यास हातभार लागेल : ISMA

नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (ISMA) हंगाम २०२३-२४ साठी देशातील साखर उत्पादन अपडेट्स जाहीर केले आहेत. त्यांनी जाहीर केलेली आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ अखेर देशाचे साखरेचे उत्पादन सुमारे ३१४ लाख टनांपर्यंत पोहोचणार आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमधील कारखान्यांकडून ५-६ लाख टन अतिरिक्त उत्पादन अपेक्षित असून, अंतिम निव्वळ साखर उत्पादन सुमारे ३२० लाख टन असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

देशातील ५१६ कारखान्यांनी त्यांचे गाळप पूर्ण केले आहे, तर गेल्यावर्षीच्या एप्रिलअखेर ४६० कारखाने बंद झाले होते. एप्रिलअखेरीस १६ कारखाने सुरू होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या ५७ ने कमी आहे. कारण, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील काही कारखाने जून-सप्टेंबरमध्ये विशेष हंगाम चालवतील आणि एकत्रितपणे सुमारे ५-६ लाख टन साखरेचे योगदान देतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, मार्च २०२४ मधील ISMA च्या अंदाजानुसार हंगामासाठी निव्वळ अंतिम साखर उत्पादन सुमारे ३२० लाख टन असेल.

एक ऑक्टोबर २०२३ पर्यंतचा सुमारे ५६ लाख टनांचा प्रारंभिक साठा आणि हंगामासाठी अंदाजे २८५ लाख टन घरगुती साखरेचा वापर लक्षात घेता ISMA ने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत ९१ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज ५५ लाख टनांच्या प्रमाणित साठ्याच्या अंदाजापेक्षा ३६ लाख टन अधिक आहे. हा साठा निष्क्रिय इन्व्हेंट्री आणि वहन खर्चामुळे कारखानदारांना अतिरिक्त खर्चास कारणीभूत ठरू शकतो.

‘इस्मा’ला २०२४-२५ मध्ये मध्यम गाळप हंगामाची अपेक्षा आहे. ज्यामध्ये उसासाठी योग्य आणि फायदेशीर किंमत (FRP) वाढीची घोषणा, मान्सूनपूर्व पाऊस आणि सामान्यपेक्षा जास्त मान्सून या घटकांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या वर्षात स्टॉक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

या अंदाजामुळे ISMA ने सरकारला चालू हंगामात २० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे देशांतर्गत वापर आणि इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम (EBP) साठी पुरेसा साठा असल्यानंतरही आर्थिक तरलतादेखील सुनिश्चित होईल. साखर कारखानदारांची स्थिती सुधारेल आणि शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देणे शक्य होईल. निर्यातीला परवानगी दिल्याने साखर उद्योग सुरळीत चालण्यास हातभार लागेल आणि आर्थिक स्थैर्याला चालना मिळेल, असा विश्वास इस्माला आहे.

यावर्षीच्या साखर उत्पादनाबाबत आपले मत मांडताना, इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (ISMA) चे महासंचालक दीपक बल्लानी म्हणाले, यावर्षी साखर उद्योगासाठी सकारात्मक उत्पादनाची आकडेवारी मांडताना आम्हाला आनंद होत आहे. साखरेचे अंदाजे उत्पादन आमच्या भागधारकांचे सामूहिक प्रयत्न आणि उद्योगाची लवचिकता दर्शवते. त्यामुळे, चालू हंगामात २० लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचा विचार सरकारने करावा. त्याचा लाभ केवळ उद्योगालाच होणार नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेही कल्याण होईल. ISMA ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशातील साखर उद्योगाच्या निरंतर वाढीसाठी वचनबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here