आंध्र प्रदेश सरकार बंद साखर कारखान्यांना पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न

विशाखापट्टणम: राज्य मंत्रिमंडळाच्या उप समिती चे सदस्य आणि नगरपालिका विभागाचे मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी सांगितले की, राज्य सरकार बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना पुनर्जिवित करण्याच्या प्रयत्नात आहे. समितीचे सदस्यांमध्ये मंत्री के कन्नाबाबू, गौतम रेड्डी, मुट्टमसेंट्टी श्रीनिवास राव, काकीनाडा चे खासदार वंगा गुता, आमदारांमध्ये दादिसती राजा. हरिचौता पूर्ण प्रसाद, गुल्ला बाबूराव, अमीरदीप आदी सामिल आहेत. समिती सदस्यांनी टंडवा आणि एटिकोपका सहकारी साखर कारखान्यांचा दौरा केला आणि शेतकरी आणि श्रमिकांबरोबर चर्चा केली.

मंत्री सत्यानारायण यांनी सांगितले की, त्या साखर कारखान्यांचा दौरा केल्यानंतर सरकारला एक अहवाल देतील. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री गेल्या सरकारकडून प्रलंबित थकबाकीला मंजूरी देवून कारखान्यांना पुनर्जिवित करण्याबाबत खूप सकारात्मक आहे. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार टंडवा कारखान्याला 9 करोड रुपये आणि एटिकोपका कारखान्याचे 7 करोड रुपयांचे प्रलंबित थकबाकी देईल. त्यांनी आरोप केला की, गेल्या सरकारच्या थकबाकी भागवण्यात अपयश आल्याचे कारखान्यांसाठी महाग झाले, आणि गाळप कमी झाले. सरकार राज्यामध्ये 12 कारखान्यांना पुनर्जिवित करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here