व्यंकटेश्‍वरा साखर कारखाना सुरु करण्याची मागणी

आंध्रप्रदेश : आंध्रप्रदेशामध्ये व्यंकटेंश्‍वरा साखर कारखाना सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. प्रदेशातील भाजपाच्या प्लांटने सांगितले की, वायएसआरसीपी ने आपल्या निवडणूकीच्या घोषणा पत्रामध्ये सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याचे वचन दिले होते. आता पक्षाची मागणी आहे की, वायएसआयसीपी ला आता निवणूकीतील वचन पूर्ण करणे आवश्यक आहे. 1974 मध्ये स्थापित, व्यंकटेश्‍वर कारखाना बंद करण्यात आला होता आणि 2003-04 च्या आर्थिक वर्षामध्ये कारखान्याचा लिलाव करण्याची योजना बनवली गेली होती, ज्यामुळे शेतकर्‍यांनी कायदेशीर हस्तक्षेप करुन थांबवला होता.

भाजप सहकारी सेल चे राज्य संयोजक अकुला सतीश कुमार यांनी सांगितले की, कारखाना 2004-05 च्या आर्थिक वर्षामध्ये सरकारकडून पुनर्जिवित केला गेला होंता, पुन्हा हा 2014-15 च्या आर्थिक वर्षात बंद करण्यात आला. ज्यामुळे ऊस उत्पादकांना खाजगी साखर कारखान्यांवर निर्भर रहावे लागले. त्यांनी राज्य सरकारला आठवण करून दिली की, मुख्यमंत्री एस. जगन मोहन रेड्डी यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या पदयात्रे दरम्यान कारखान्याला पुनर्जिवित करण्याचे वचन दिले होते. आता त्यांना आपले वचन निभवणे गरजेचे आहे. सतीश कुमार म्हणाले, पक्षाला सत्तेवर येवून एक वर्ष झाले, पण कारखाना सुरु करण्यासंदर्भात कसलीही हालचाल सुरु झालेली नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here