नेपाळमध्ये तापला ऊस थकबाकीचा मुद्दा

काठमांडू : सरलाही जिल्ह्यातील ऊस शेतकर्‍यांना आतापर्यंत जवळपास 240 दशलक्ष रुपयांची थकबाकी मिळालेली नाही. जिल्ह्यातील धनकौल येथील अन्नपूर्णा साखर कारखाना शेतकर्‍यांना पैसे देण्यात अपयशी ठरला आहे. साखर कारखान्यांकडून प्रलंबित ऊस थकबाकी भागवण्याच्या मागणीबाबत ऊस शेतकर्‍यांनी गेल्या डिसेंबरमध्ये काठमांडू मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर काही कारखान्यांनी थकबाकी भागवण्यास सुरुवात केली होती . अन्नपूर्णा साखर कारखान्याने आजपर्यंत शेतकर्‍यांचे पैसे भागवलेले नाहीत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कि, त्यांची थकबाकी खूप काळापासून देय आहे. त्यांनी साखर कारखान्याच्या या स्थितीसाठी सरकारच्या उदासीनतेला दोषी ठरवले आहे.

नेपाळ फेडरेशन ऑफ केन प्रोड्यूसर्स चे चेअरमन कपिलमुनि नुपाने यांनी सांगितले की, शेतकर्‍यांनचे गेल्या तीन ते चार वर्षांपासूनचे देय प्रलंबित आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांच्यात निराशा आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here