ऊस थकबाकीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

हापुड : ऊस थकबाकी भागवण्याच्या मागणीबाबत भाकियू भानू यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. 14 सप्टेंबर पासून भाकियू कडून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले जात आहे. यासंदर्भामध्ये सोमवारी ऊस सचिवांना निवेदन देवून थकबाकी भागवण्याची मागणी केली आहे.

सिंभावली ऊस समितीमध्ये सोमवारी भाकियू भानु बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष पवन हुण यांनी सांगितले की, नव्या गाळप हंगामाच्या शुभारंभाची वेळ आता आली आहे. पण आतापर्यंत गेल्या हंगामाचे पैसे भागवलेले नाहीत. सुबीश त्यागी यांनी सांगितलेकी, आता आरपारच्या लढाईची वेळ आली आहे. शेतकरी कर्ज घेवून आपले काम करत आहेत, पण कारखाने त्यांचे पैसे देत नाहीत. रुपराम सिंह यांनी सांगितले की, आता ऊस थकबाकी भागवण्यासाठी 14 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले जाईल. यासाठी भाकियू भानु यांनी पूर्ण रणनिती तयार केली आहे. बैठकीनंतर माजी चेअरमन गब्बर सिंह यांच्या नेतृत्वामध्ये ऊस समिती सचिव यांना निवेदन देवून ऊस थकबाकी भागवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरनजीत गुर्जर, अजय त्यागी, अनिल गुर्जर, दयाराम, राकेश गिरी आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here