शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन, सर्व ऊसाचे होणार गाळप

बीड : मराठवाड्यात उच्चांकी ऊस उत्पादन झाले आहे. आणि शेतात उभ्या असलेल्या उसाचे गाळप न होण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. आता सर्व उसाचे गाळप होईल यासाठी व्यवस्था करण्यात प्रशासनाने प्रयत्न चालू केले आहेत.
ऊसाचे गाळप होत नसल्याने निराश झालेल्या जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी नामदेव आसाराम जाधव (वय ३०) यांची बुधवारी दुपारी दोन एकर उसाला आग लावून आत्महत्या केली.

या घटनेनंतर जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, कुटूंबाला तुमची गरज आहे, असे आवाहन केले आहे. प्रशासन तुमच्या सोबत आहे. सरकार अतिरिक्त उसाच्या गाळपावर तोडगा काढत आहे. त्यातून मदतही मिळेल. आत्महत्या न करता या कामात प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन शर्मा यांनी केले. त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत उप जिल्हाधिकारी संतोष राऊत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here