यूपीच्या पश्चिम भागात २० ऑक्टोबरपासून ऊस गाळपाचे प्रयत्न

लखनौ : उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात २० ऑक्टोबरपासून तर संपूर्ण राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून उसाचा गाळप हंगाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ऊस मंत्री सुरेश राणा यांनी दिली. पिपराईट, बलरामपूरमध्ये उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Patrika.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार लोक भवनातील मीडिया सेंटरमध्ये ऊस मंत्री राणा म्हणाले, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी याआधीच्या हंगामातील सर्व ऊस बिले द्यावीत यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपने गेल्या चार वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक पैसे मिळवून दिले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प करण्याच्या दिशेने सरकार प्रयत्न करीत आहे. ऊस उत्पादन, लागवड क्षेत्र, इथेनॉल उत्पादन तसेच ऊस बिले देण्यात उत्तर प्रदेश राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काल उसाच्या दरात २५ रुपयांची वाढ करून ऊस दर ३५० रुपये प्रती क्विंटल केला आहे. या दरवाढीमुळे आगामी हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४,००० कोटी रुपयांचा थेट फायदा मिळेल.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here