रमाला साखर कारखान्याची चेन तुटली, शेतकऱ्यांचा गोंधळ

बागपत : रमाला सहकारी साखर कारखान्याची सोमवारी पुन्हा एकदा ऊस चेन तुटली आणि कारखाना बंद झाला. संध्याकाळी चेन ठीक करून घेतल्यानंतर कारखाना पुन्हा सुरु केला. १२ तास कारखाना बंद असल्यामुळे कारखान्यात ऊसाच्या भरलेल्या वाहनांची लांबच लांब रांग लागल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला .

सुरेश, अनिल, रामकुमार, सचिन यांनी आरोप केला की, साखर कारखान्यात अलीकडे सतत तांत्रिक समस्या येत असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यालाही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाईट दर्जाची सामग्रीच्या वापरामुळे कारखान्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. संध्याकाळी ६ वाजता कारखान्यात ऊस गाळप सुरु झाले,यानंतर शेतकरी शांत झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here